जलजीवन योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांचे पाली पंचायत समिती आवारात आमरण उपोषण सुरू
![]() |
जलजीवन योजनेतील भ्रष्टाचारा विरोधात सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांचे पाली पंचायत समिती आवारात आमरण उपोषण सुरू |
पाली (अमित गवळे ) दि. १६ ऑगस्ट २०२३ सुधागड : सुधागड तालुका हा आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखला जातो. विकासाच्या नावाखाली शासनाच्या विविधांगी व कोट्यावधी निधीच्या योजना आणल्या जातात. मात्र, पाणी पुरवठ्याच्या योजनेत भ्रष्टाचाराचे पाणी मुरत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या लताताई कळंबे यांनी केला आहे. यामध्ये ठेकेदार व प्रशासनाचे संबंधित अधिकारी सामील असल्याचा आरोप कळंबे यांनी केला आहे.
जल जीवन मिशन योजना, बंधारे व विहिरीत भ्रष्टाचाराचे पाणी मुरले असून, यातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी लताताई कळंबे यांनी कंबर कसली आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्याविरोधात लताताई कळंबे यांनी पाली पंचायत समिती कार्यालय आवारात स्वातंत्रदिनी आमरण उपोषणाला बसले आहेत. सदर आमरण उपोषणाच्या निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, पोलीस अधीक्षक रायगड, तहसीलदार पाली सुधागड आदींना देण्यात आली आहे. सदर निवेदनात नमूद केले आहे की सुधागड तालुक्यात सरकारी योजनेअंतर्गत तसेच केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन व जिल्हा परिषदेच्या फंडातून बांधण्यात आलेल्या विहिरी, बंधारे, व त्यासाठी किती कोटी रुपयांचा निधी वापरला याचा प्रशासनाकडून लेखाजोगा मिळावा या मागणीसाठी पाली सुधागडच्या सामाजिक कार्यकर्त्या लताताई कळंबे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या विरोधात लताताई कळंबे यांनी (१५) रोजी ऑगस्ट मंगळवारी दुपारी २.०० वाजता स्वातंत्रदिनी पाली पंचायत समितीच्या प्रांगणात आमरण उपोषण बसले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत